शिक्षक भरतीत द्या डावलेल्यांना संधी
शिक्षक भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम देण्याची, कागदपत्र तपासणी पूर्ण केल्यानंतरही २५२ उमदेवारांना डावलण्यात आले. मुंबई महापालिकेतील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विविध पातळीवर उमेदवारांनी प्रश्नाबाबत आवाज उठवला. डीटीएड, बीएड कृती समितीने या उमेदवारांना नियुक्ती देण्याची मागणी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवारांचाही यात समावेश आहे. शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे. त्यात पहिल्या टप्प्यात तल्कालिन राज्य सरकारने १२ हजार जागा भरण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात पाच हजार ८२२ जागांसाठी उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यातील अनेकांची नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मुंबई महापालिकेतील जागांसाठी जाहिरात आल्यानंतर पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळांसाठी प्राधान्यक्रम आले. त्यानुसार उमेदवारांनी पुढची प्रक्रिया केली. त्यांची कागदपत्र तपासणी ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाली. तीन महिन्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने शालेयस्तरावर इंग्रजी माध्यम नसल्याचे कारण पुढे करत २५२ विद्यार्थ्यांना अपात्र ठरवले. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर अपात्र कसे, असा प्रश्न करत उमेदवारांनी आयुक्तांची भेट घेतली. संघटनेने ही आयुक्तांची भेट घेत या शिक्षकांना नियुक्ती देण्याची मागणी केली आहे. प्रक्रिया होऊन चार महिने झाले तरी हे विद्यार्थी खेट्या मारत आहेत. राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांचा हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
नुकसान थांबावावे
प्रशासकीय पातळीवरील चुकांचा फटका उमेदवारांना का, असा प्रश्न करत उमेदवारांचे आर्थिक, मानसिक शारीरिक नुकसान थांबवावे, असे डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने म्हटले आहे.
SOURCE: https://maharashtratimes.indiatimes.com/
GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college










